बेल्हे आठवडे बाजारात बैलांची आवक वाढली; मात्र किंमत स्थिर   

बैलांची आवक वाढली; मात्र किंमत स्थिर

बेल्हे, (वार्ताहर) : राज्यात प्रसिद्ध असलेल्या बेल्हे आठवडे बैल बाजारात सोमवारी बैलांची आवक चांगली वाढली; मात्र बैलांचे भाव मात्र स्थिरच होते. या बाजाराबरोबरच शेळी मेंढीचा बाजार, तरकारी बाजार, कडधान्य बाजारही मोठा भरतो.येथे संगमनेर,नाशिक, लासलगांव, कल्याण, नांदेड, बीड, धाराशिव, अहिल्यानगर आदी जिल्ह्यातून व तालुक्यातून शेतकरी व व्यापारी बैल खरेदी विक्रीसाठी येतात. या प्रसिद्ध असणार्‍या बैल बाजारात गावठी, म्हैसुरी, खिल्लारी व पंढरपुरी बैल विक्रीसाठी येतात. या बैल बाजारात बैलांची आवक बर्‍यापैकी होती. मात्र, बैलांचे भाव मात्र स्थिरच होते. गेल्या काही दिवसांपासून या बैल बाजारात बैलांना शोटा फार जास्त भाव आहेत. त्यामुळे बैलांची आवक वाढली आहे.
 
बैलांची आवक ६०० एवढी झाली तर विक्री ४२८ एवढी झाली. तसेच म्हशी व रेडे २०६ आवक झाली तर विक्री १५९ झाली. गावठी बैलांना जास्त मागणी होती. ७० हजार रुपयांना या बाजारात खिल्लार बैलजोडी मिळते, असे अनेक व्यापारी व शेतकर्‍यांनी सांगितले.गावठी बैलांना जास्त मागणी होती. बैल बाजारात खिल्लारी बैल जोडीचे भाव ६० ते ७० हजार रुपये तर गावठी बैलजोडीचे भाव ४० ते ५० हजार रुपये असे होते. कालच्या बैल बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली. बैलांची आवक ६०० एवढी झाली तर विक्री ४२८ एवढी झाली. तसेच म्हशी व व रेडे २०६ आवक तर विक्री १५९ झाली. तर शेळ्या मेंढ्यांची आवक २५१ झाली तर विक्री १२६ झाली. खरेदी-विक्रीचे व्यवहार ओळखीवर, उसनवारीवर व इसार देऊन होतात. बैल बाजारातून महागडे बैल खरेदी करण्यापेक्षा ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत शेतकरी करून घेत आहेत. शेतीची आजच्या बैल बाजारात बैलांचे व्यवहारही बर्‍यापैकी झाले असल्याची माहिती बाजार समितीचे कार्यालयीन प्रमुख शैलेश नायकवाडी यांनी दिली.
 
शेतकरी बैल बाजारातून महागडे बैल खरेदी न करता ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती करून घेत आहे. शेतीची मशागत लवकर होत आहे. सध्या शेतकरी यांत्रिकीकरणा वरच जास्त भर दिलेला आहे, असे व्यापारी संतोष पिंगट यांनी सांगितले. सध्या जनावरे सांभाळणे शेतकरी वर्गाना अवघड झाले असून एका दिवसाचा बैलजोडीचा जनावराचा खर्च ७०० रुपयांच्या आसपास येतो. त्यामध्ये ओला चारा, सुका चारा व पशुखाद्य असा आहे. त्यातही महागाई जास्त वाढली आहे, असे जामखेड चे व्यापारी अविनाश मुळे यांनी सांगितले.
 
संगमनेर, नाशिक, लासलगांव, कल्याण, नांदेड, बीड, धाराशिव आदी जिल्ह्यांतून येतात व्यापारी अन् शेतकरी; शेळी मेंढी, तरकारी तसेच कडधान्याचाही भरतो बाजार, खरेदीसाठी शेतकर्‍यांची गर्दी होती.
 

Related Articles